दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं.पण पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर हल्ला केला.त्यावरून आता देशभरात संताप व्यक्त केला जातोय.. सोशल मीडियावर देखील या हल्ल्यावरून टीकेची झोड उठलीय. NDTV चे प्रतिनिधी आणि माझे सहकारी शुभम हरणे यांनी काही सवाल उपस्थित करत धर्मांध दहशतवादावर बोट ठेवलंय, ते चांगलंच व्हायरल होतंय.