जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असून सलग पाचव्या दिवशी तापमान 42 अंशांच्या पार गेलंय.. वाढत्या तापमानासोबतच हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे वाढत्या तापमानासोबतच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील निर्माण झाली आहे.. उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..