मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय.उपोषणाला बसू नये यासाठी सरकारचं शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊनमनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न केलेत. मात्र जरांगे उपोषणाला बसण्यावर ठाम आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता तीन वर्षे होत आहेत. हे आंदोलन सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात किती नोंदी सापडल्या आहेत?, असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय.