परतीच्या पावसाने नाशिकच्या मनमाड परिसरातील झेंडू पिकाला मोठा फटका बसला आहे. झेंडूची फुले जमिनीवर पडून सडू लागली आहेत. व्यापारी ओली फुले घेत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे, त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. यावर्षी झेंडू उत्पादकांची दिवाळी-दसरा कडू होणार आहे.