सोयाबीनला हमीभाव द्यावा यासाठी पाशा पटेल यांनी पायी दिंडी काढली होती. मात्र ते आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. पाशा पटेल एवढे बदलतील असं मला वाटलं नव्हतं. एवढे बदलले कसे हा चिंतनाचा विषय आहे असं म्हणत बच्चू कडूंनी पाशा पटेल यांच्यावर टीका केली आहे.