त्रिभाषेच्या मुद्द्यावरून महायुतीचं सरकार आणि राज ठाकरेंमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे आनंद दुबे यांनी केलाय.आम्ही तुमच्यासाठी बॅटिंग करतो,तुम्ही आमच्यासाठी बॅटिंग करा असं काहीसं भाजप आणि मनसेत सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. महापालिका निवडणुका जवळ आलेल्या असतानाच हिंदी-मराठीचा वाद पुढे केल्याचं म्हटलं जातंय.