आजपासून मुंबई-सोलापूर विमान प्रवास सुरू झालाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ झाला. त्यानंतर अनेक प्रवाशांनी सोलापूर-मुंबई असा प्रवास केला.. हा प्रवास सुखकर असून वेळेची मोठी बचत होतेय अशी प्रतिक्रिया विमान प्रवाशांनी दिली.. तसंच ही सेवा नियमित आणि परवडणाऱ्या दरात सुरू राहावी अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केलीये..