नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार बघायला मिळते आहे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस चांगला बरसत असल्याने जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठाही 92 टक्क्यांवर जाऊन पोहोचला असून 23 पैकी 13 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने..