पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचाही मृत्यू झालाय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबाची भेट घेतलीय... यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी घटनाक्रम सांगत अनुभव सांगितला.