रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषदेने महावीर जयंतीनिमित्त ३० आणि ३१ मार्च रोजी मांसविक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जैन संघटनेच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, 'मराठी एकता संघाने' या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. "भगवान महावीरांच्या विचारांचा आम्हाला नितांत आदर आहे, पण कोणाच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे चुकीचे आहे," अशी भूमिका संघाने मांडली आहे.