पंढरपुरात होणाऱ्या चैत्र-यात्रेवर देखील गॅस टंचाईचे आणि युद्धाचे सावट मोठ्या प्रमाणावर घोंगावताना दिसत आहे.गुढीपाडव्यापासून पंढरपुरात चैत्र वारीचा पर्वकाळ सुरू होतो... भाविकांची देखील गर्दी होण्यास सुरुवात होते.याच पार्श्वभूमीवर गॅस टंचाईचे सावट भाविकांच्या संख्येवर परिणामकारक ठरू शकते... या चैत्र वारी बाबत प्रशासनाने बैठक घेऊन गॅस सिलेंडरचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे... मात्र येणाऱ्या चार ते पाच लाख भाविकांच्या दृष्टीने चैत्री वारीचे गॅस टंचाईचे सावट अधिक गडद आहे.