राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात आणखी एक चर्चा झाली ती म्हणजे मंत्रिपदाची. धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाच्या हुकलेल्या संधीबाबत क्रिकेटच्या खेळाचं उदाहरण देत नाराजी व्यक्त केलीय, आम्ही कायम बारावेच राहणार, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलीय. तसंच वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतरही सूर्यकुमार यादवलाही संघाबाहेर राहावं लागतं, असंही मुंडेंनी यावेळी म्हटलंय..