Washim| उतावळी नदीच्या पुरात शेतातली 300 केळीची रोपं गेली वाहून | NDTV मराठी

वाशिमच्या उतावळी नदीला काल पूर आला होता.यामुळे पिंपरी सरहद्द गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती अक्षरशः वाहून गेली.शेतात कमरेपर्यंत खोल खड्डे पडल्यामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे.शेतकरी संतोष इंगळे यांच्या शेतात लावलेली केळीची सुमारे ३०० रोपे पुराच्या पाण्याने पूर्णतः वाहून गेलीत.. या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. अद्याप कोणतेही प्रशासकीय पथक पाहणीसाठी आलेले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ