Palgharच्या सातपाटी गावात शिरलं समुद्राच्या भरतीचं पाणी, किनारपट्टीवरील घरांचे अस्तित्त्वच धोक्यात

समुद्राला मोठे उधाण आल्याने पालघर तालुक्यातील सातपाटी गावात समुद्राचं पाणी शिरलंय. समुद्राच्या पाण्याने समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षक बंधारा ओलांडून लोकांच्या घरात शिरकाव केला. समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनारपट्टीवरील घरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सातपाटी हे पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून गावाच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आणि खाडी आहे. त्यामुळे समुद्राला ज्यावेळी मोठी भरती येते तेव्हा कमी उंचीचा संरक्षक बंधारा ओलांडून पाणी गावात शिरते. यंदा 29 जूनपर्यंत समुद्राला मोठी भरती येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ