जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 50 मीटरने उघडलेत.... हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे... धरणातील जलसाठा 64.95% टक्क्यावर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे 50 मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 5 हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली असून त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत