श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड इथनं निघालेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. दुसऱ्या दिवशीच मार्गामध्ये रस्ता नसल्यानं मात्र वारकऱ्यांना पाण्यातनं मार्ग काढून पुढे जावं लागलं. वारकऱ्यांनी तब्बल सहा किलोमीटरचा प्रवास नदी पात्रातनं केलेला आहे.