शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अचानक विधान परिषदेचे आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली.. पण यामुळे राजकीय गणितासह आघाडीचं समिकरण सुद्धा बिघडणार असं दिसत आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत म्हंटल्यावर आता काँग्रेस ने तलवार काढलीच पण भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा बेरजेचं गणित जुळवायला सुरुवात केली आहे..