भारतात टी २० कुणी आणलं..भारतात आयपीएलचा जलवा कुणी सुरू केला... तर त्याचं उत्तर आहे... ललित मोदी..एकेकाळी ललित मोदी हे क्रिकेट आणि ग्लॅमरमधलं मोठं प्रस्थ होतं... पण ललित मोदींवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाल्यावर ते लंडनमध्ये निघून गेले.आता पुन्हा ललित मोदी चर्चेत आलेत ते त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे..या मुलाखतीत ललित मोदींनी राहुल गांधी, चिदंबरम, सुश्मिता सेन, रणवीर सिंह यांच्याबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केलेत.