मराठवाड्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला.तिकडे नाशिकमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीला पूर आलाय.त्यामुळे संभाजीनगरच्या जायकवाडीतील नाथसागर धरण ओव्हरफ्लो होतंय. त्यामुळे धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आलेत.नाथसागर धरणातून विसर्ग 2 लाख 7 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात येतोय.. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.