मुंबईतील आंदोलनाला हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी NDTV मराठीवर आपली भूमिका स्पष्ट केली. "आम्ही न्यायालयाचा आदर करतो, पण आमचा लढा शांततेत सुरूच राहील. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही," असे जरांगे म्हणाले. त्यांच्या वकिलांची टीम पुन्हा कोर्टात जाऊन परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.