मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन सरकारच्या शिष्टमंडळांने भेट घेतली.यावेळी शिंदे समिती स्थापन करण्याआधीच्या नोंदी आणि आता शोधलेल्या कुणबी नोंदी एकत्र का दाखवतात असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. तर काही अधिकारी सरकारची बदनामी करतायत, त्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला.तर 29 ऑगस्टपासून आंदोलन होणारच असा इशारा या बैठकीनंतर जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय.