भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना आवर घालण्याची मागणी विरोधकांसह सर्वसामान्यांकडूनही होत आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळे अखेर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पडळकरांची तक्रार केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही पडळकरांना फोन करून झापल्याचं बोललं जात आहे.