यंदाच्या मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका प्रचंड चुरशीच्या होणार आहेत. विशेषतः ठाणे महापालिकेत शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. भाजपच्या गणेश नाईकांनी सुरू केलेल्या 'जनता दरबार' कार्यक्रमांविरोधात शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता नाईक विरुद्ध शिंदे हा संघर्ष आणखी वाढणार आहे.