महाराष्ट्रात जून महिन्यापासून एल निनो सक्रिय झाला असून त्याची तीव्रता सतत वाढत आहे. यामुळे राज्यात पावसाचे अत्यंत असमान वितरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.