मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढलीय. त्यामुळे कल्याण-टिटवाला मार्गावर असलेल्या जुन्या रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय.भिवंडीतील पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणारा वऱ्हाळ तलाव हा ओव्हरफ्लो झालाय. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झालाय.