अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी ठाकरे गटच्या वतीने रामरक्षा आंदोलन करण्यात आलंय.. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनातून भाजपावर जोरदार निशाणा साधला.'रामरक्षा आंदोलनात' त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली. रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी प्रथम राम मंदिरातील कथित गैरव्यवहारांबाबत उत्तर द्यावे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी ठाकरेंनी केली.