परीक्षेतील गोंधळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि भाजपला धारेवर धरलं आहे. परीक्षेतील गैरव्यवस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. या गोंधळाचे राजकीय परिणाम भाजपला भविष्यात भोगावे लागतील, असा दावा पटोले यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असंही ते म्हणाले.