आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाचा गोडप्रसाद घरी घेऊन जावा. ही प्रत्येक भाविकाची इच्छा असते. यासाठीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने सध्या 13 लाख 50 हजार लाडके निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे. हरभरा डाळ, साखर , आणि तेलाचा वापर करून विठ्ठलाचा गोड लाडू प्रसाद तयार होतोय.याच लाडू प्रसाद निर्मिती केंद्रावरून आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी.