मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय... विधान परिषद निवडणुकीत आपल्या वाट्याला अधिक जागा मिळाव्या, यासाठी मारामाऱ्या सुरू आहेत. मात्र दुसरीकडे शेतकरी मरतो आहे, महागाई आवाक्याबाहेर गेली, पेट्रोल डिझेल मिळत नाही, याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही... असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.. मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्र्यांनी शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर नियोजनाच्या बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र यांना सत्तेपुढे काही दिसत नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.