2018 ला बीडमध्ये दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, आणि आता त्याच बीड जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. एकेकाळी पाण्यासाठी तडफडणाऱ्या बीडवर आता 'ओल्या दुष्काळा'चं संकट आलं आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आलेल्या बीडमधील परिस्थिती अक्षरशः ३६० अंशांनी बदलली आहे. या रिपोर्टमध्ये बीडमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आणि 'ओल्या दुष्काळा'चा आढावा घेण्यात आला आहे.