सकाळपासून कल्याण-डोंबिवलीत पाऊस सुरू आहे. कल्याण ग्रामीणमध्ये उल्हास आणि काळू नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या नद्यांवरील पुलांवरून वाहतूक सध्या सुरू असली तरी, नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.