Maharashtra Rain Updates| महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट गडद, राज्यात अवकाळी, जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट गडद होऊ लागलं आहे. गेल्या आठवडाभरापासून अवकाळीनं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या वडनेर भैरव परिसरात काल सायंकाळ सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने अक्षरक्ष: थैमान घातले. त्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला असून, द्राक्ष बागांमध्ये अक्षरश: दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते.तर सांगली, गडचिरोली, पुण्यातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय. पाण्याच्या जोरामुळे शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले असून जनजीवनही विस्कळीत झालेय.

संबंधित व्हिडीओ