'रोखठोक'मधून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका करण्यात आली.'युद्ध पुकारले ते पूर्णत्वास नेले नाहीच.अमेरिका व्यापार बंद करेल या धमकीनंतर शस्त्रसंधी करून आपण मोकळे झालो.'हे सर्व नेहरूंनी नाही तर मोदींनी केलंय असं सामनातून म्हटलंय.कोणताही निकाल न लावता 2025चे भारत-पाक युद्ध आपले 56 इंच छातीवाले पंतप्रधान मोदी यांनी संपवले आहे.भारतीय इतिहासात या घटनेची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल.असंही सामनातून म्हटलंय.