एकनाथ शिंदे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले त्यावरून अजित पवारांनी टोला लगावलाय.येऊ शकत नाही तर प्रतिनिधी पाठवू नका,असे प्रतिनिधी पाठवत राहिले तर प्रत्येकजण प्रतिनिधी पाठवेल,ज्याचा सन्मान त्यानेच स्वीकारला पाहिजे, अशा शब्दात अजित पवारांनी खंत व्यक्त केली.अजित पवार नाराज असल्याची चर्चा असतानाच त्यावर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलंय. फडणवीस, पवार, शिंदे तिन्ही भावांसारखं काम करतायत.. त्याचा मी साक्षी आहे असं बावनकुळे म्हणालेत.