राज्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता विधानसभेत चर्चेचा विषय ठरलाय…शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे…भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं…तसेच कुत्र्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता मेनका गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला…