मुंबईसह उपनगर, ठाणे, रायगड परिसरात मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालंय.. काही ठिकाणी पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या देखील घटना घडल्या.