नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या महापुराचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे... याच पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे... संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलही सज्ज झालंय... हिंडन आणि पालम एअरबेसवर विमाने तयार ठेवण्यात आली आहेत... परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकारचे नियंत्रण कक्ष सातत्याने लक्ष ठेवून आहेत.