बीड जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बीडकरांना आवाहन करत म्हटलं की, जिल्ह्याची मान खाली घालणाऱ्या व्यक्तींना थारा देऊ नका. येत्या पाच वर्षांत बीडचं नाव मोठं करण्यासाठी त्यांनी जनतेला सहकार्य करण्याचं आवाहनही केलं.