परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकेकाळी वर्चस्व होते, पण दोन्ही पक्षांतील फुटीनंतर येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महायुतीमुळे भाजपचे वजनही वाढले आहे. त्यातच आमदार मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याने भाजपची ताकद आणखी वाढली आहे. या फुटीर राजकारणाचा आणि भाजपच्या वाढत्या ताकदीचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम होणार? परभणीच्या या बदललेल्या राजकीय समीकरणांचा सविस्तर आढावा या रिपोर्टमधून घेऊया.