सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांचे नुकसान होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका वर्षात या महामार्गावर 300 पेक्षा जास्त अपघाती मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या अपघातांमागे रस्त्यावरील खड्डे, ओव्हरलोड वाहने आणि निकृष्ट देखभाल ही प्रमुख कारणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.