पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय शिकवला जावा याबाबतीत वाद सुरू आहे.मात्र मुंबईतील मराठी शाळेचे वास्तव आता समोर येतंय.मराठी शाळांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मराठी शाळा बंद पडल्या ही स्थिती मुंबई आहे.दादर येथील नायगाव मध्ये असलेली सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक मराठी शाळा बंद पडलेलीय.शाळेची अवस्था इतकी दयनीय झाले की या शाळेचे रूपांतर व्यावसायिक गाळे स्वरूपात झाले आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी.