उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठे विधान केले आहे. महायुतीची रणनीती तयार झाली असून ती गोपनीय आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत विधानसभेपेक्षा दुप्पट यश मिळेल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. मित्रपक्षांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याने स्वबळाचा नारा नाईलाजाने दिला, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.