वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी मोठं वक्तव्य केलंय. निवडणुकीतील पैशांचा वाढता वापर आणि मतदारांच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट निवडणुकीतून माघार घेण्याचे किंवा फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत.