लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट अहमदपूर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचं पहायला मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली आहे. मात्र अजुनही काही शेतांमध्ये पाणी असल्याचं पहायला मिळत आहे.शेतात पाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नसल्याने शेतकरी हवालदील झाल्याचे पहायला मिळत आहे.