अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला वाद काही केल्याने संपेना असंच चित्र आहे.अजित पवारांना जाऊन 28 मे रोजी 4 महिने पूर्ण होतील पण अजूनही नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत.राष्ट्रवादीची आज देवगिरी निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात जुंपली.अजित पवारांच्या निधनानंतर आम्ही दोघेच टीकेचे धनी का असा सवाल नेत्यांना उद्देशून तटकरेंनी उपस्थित केला.आणि तटकरे बोलायला उभे राहणार त्याआधीच पार्थ पवार मात्र बैठकीतून निघून गेले, इतकंच नाही तर मुंबईतच असलेले प्रफुल पटेलांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवलीय