कबुतरखानाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेपास नकार दिल्यानंतर आता मुंबई महापालिकेने आक्रमक भूमिका घेतलीय. फक्त कबुतरखानाच नव्हे तर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार आहे. तसंच दादरसह इतर कबुतरखान्यांवर लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न पुन्हा केल्यास थेट पोलीसात तक्रार देऊन गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ही कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी महापालिकेचे कर्मचारी तैनात असतील..