इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आणखी विकोपाला गेलाय. गेल्या २२ महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षाचा शेवट गाझापट्टीवर 100 टक्के ताबा मिळाल्यावरच करता येईल, असं इस्रायलनं ठरवून टाकलंय. म्हणून शनिवारपासून इस्रायलच्या सैन्यानं नव्याने हल्ल्यांना सुरुवात केलीय.काल रात्री इस्रायली सेनेनं केलेल्या हल्ल्यात अल जजीराचे पाच पत्रकार मारले गेलेत. त्यामुळे जगभरातून इस्रायलच्या युद्धनीतीचा निषेध वाढतोय...