हिंगोली जिल्ह्यात सध्या डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याने पेट्रोल पंप आणि डिझेल पंप बंद करण्याची वेळ आलेली आहे.तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना डिझेल मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करा लागत आहे.अफवांमुळे पेट्रोल पंपावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलली असून आदेश देखील काढलेले आहेत. दरम्यान यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..