देशामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. एका निवडणुकीचा निकाल लागला होता.खरं तर ही निवडणूक होती एका ग्रामपंचायतीची मात्र या निकालावर समाधानी नसल्याचं सांगत पराभूत उमेदवारानं थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली.अखेर सुप्रीम कोर्टानं सांगितलं आमच्यासमोर ईव्हीएम उघडा आणि मतमोजणी करा पुढे जे झालं ते धक्कादायक होतं.कारण ईव्हीएममधली मतमोजणी झाल्यावर जिंकलेला उमेदवार हरला आणि हरलेला उमेदवार जिंकला. या धक्कादायक आणि ऐतिहासिक निकालामुळे पुन्हा ईव्हीएमवरुन गदारोळ सुरू झाला.