15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच आगामी हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील कत्तलखाने,मांस आणि मटण विक्रीची दुकानें बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी काढलेत. पण या निर्णयाला आता विरोध होतोय. अगोदर जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी याविरोधात सूर लावला होता. पण आता सर्वसामान्य़ांमधूनही निषेधाचा सूर उमटतोय..अशा निर्णयांमुळे आपल्या मुलभूत स्वातंत्र्याचा संकोच होतोय, असं या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचं मत आहे. तर कुणी काय खायचं हे आयुक्त ठरवणार का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय.